Saturday, August 15, 2015

स्वातंत्र्य दिनानिमित्त काही ..

१५ ऑगस्ट २०१५ , शनिवार

स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीयांना त्यांच्यातलाच एक बांधव या नात्यानी मनापासून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.



आज आपण स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. तरी आपण व्यक्तिपूजेत आज किती आडकलो आहोत याच एक उत्कृष्ट उदाहरण आज मी पाहिल …


सकाळी ध्वजवंदन करायला महाविद्यालयात गेलो होतो. तिथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या चित्राच पूजन केल गेल. माझा महात्मा गांधींच्या पूजनाला विरोध नाही, पण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फ़क्त गांधीजींनी प्रयत्न केलेत अस नाही तर कित्येक विरांनी आपल्या प्राणांची आहुति दिली, तेंव्हा फ़क्त एकाच व्यक्तीची पूजा करण चूक आहे. 

आम्ही या हुतात्म्यांना मानतो, त्यांच आमच्या मनात असलेल स्थान कुणीच नाकारु शकत नाही, पुण्यतिथी आणि जयंती साजरी करत असतांना आम्ही त्यांच्या प्रतिमांच पूजन करतोच. 

जेंव्हा आपण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारखे राष्ट्रीय सण साजरे करतो तेंव्हा कोणत्याही नेत्याच्या प्रतिमेच पूजन करण्याऐवजी भारतमातेच्या प्रतिमेच पूजन करणच योग्य आहे,

कारण, कोणतीच व्यक्ती ही कितीही मोठी असली तरी राष्ट्रपेक्षा मोठी नसते हे लक्ष्यात घ्यायलाच हव. 
अर्थात, आज मी पहिल तिथे गांधीजींची प्रतिमा होती म्हणून मी त्यांच्या नावाचा दाखला दिला, जर तिथे अजुन कोणत्या नेत्याची प्रतिमा असली असती तर कदाचित त्यांचा उल्लेख उदाहरणात झाला असता.

शेवटी या सर्वांनी बलिदान केल ते भारतमातेच्या मुक्ततेसाठीच, हो ना ?


सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून  शुभेच्छा…
आजचा अनुभव लिहायला अर्थातच खुप उशीर झाला त्यासाठी क्षमस्व  ...  


वंदे मातरम … 
भारत माता की जय .... 

Wednesday, August 12, 2015

धर्म ...

धर्म म्हणल की फ़क्त एकच आठवत ..

कर्मण्येवा धिकारस्ते मा फलेषु कदाचन । 

कोणत्या अध्यायात गीतेमधे हा श्लोक भगवंतानी सांगितला हे मला माहित नाही. जेंव्हा हा श्लोक ऐकला तेंव्हा धर्म या सज्ञेबद्दलच्या माझ्या कल्पना बदलल्या, आपण नेहमी म्हणत असतो की मी हिंदू , तो मुसलमान , हा त्याचा मी  ह्याचा, कधीकधी आम्ही अहिंसा परमो धर्म म्हणतो तर कधी कधी माणुसकी हा माझा धर्म अशा नैतिकतेच्या गप्पा आपण करत असतो. 
जेंव्हा धर्म या संकल्पनेवर मी विचार करतो तेंव्हा मला अस वाटत की, आपल काम करत राहणे हाच खरा धर्म  ते करत असतांना आपण योग्य करतोय का अयोग्य हा विचार करण म्हणजे नैतिकता . 
हे करत  असतांना फळाची चिंता करण आणि त्याच्या अभिलषेनी कामात अडथळा निर्माण होण म्हणजेच धर्माला गालबोट लागण आहे 



अर्थात, या विषयावर अधिक लिहिण्याची माझी पण कुवत नाही कारण मी पण माणसानी  तयार केलेल्या या धर्माच्या दुष्टचक्राचाच एक भाग म्हणून या समाजात वावरत आहे. 
माझी हरकत नाही आणि असली तरी लोकांच्या आयुष्यात हरकत घेणारा मी कोण ? हा प्रश्नच आहे पण माझा या समाजव्यवस्थेचा भाग म्हणून जगत असतांना धर्माला विरोध करण हे योग्य नाही

मी जसा हिन्दू धर्माला मानतो तसाच अन्य धर्मांचा मला आदर आहे 
 माणसानी मांडलेला धर्मांतराचा खेळ हा सगळ्या धर्मांच्या मूळतत्वांना काळीमा लावणारा आहे


जस स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात म्हणून गेले ... 

"सर्वांनी आपापल्या धर्मात राहून स्वत:ची उन्नती साधावी"
हा सहिष्णुतेचा विचार मला परत एकदा मांडावासा वाटतो

' कर्म  करते जा, फल की चिंता मत कर '
आणि हाच धर्म आहे अस माझ मत आहे 

शेवटी शहाण्याला शब्दाचा मार ..


...धन्यवाद ... 

टिप : कोणाला विचार पटले नसतील तर त्यावर चर्चा करू कारण वाद करून  प्रश्न मिटत नाहीत .. 

Tuesday, August 11, 2015

आत डोकवून पाहणारा …



प्रत्येक वेळी आत डोकावण
प्रत्येकाला जमतचं अस नाही

जे डोकावून पाहू शकतात
तेच यशाची शिखर पदाक्रांत्र करतात

तस होण्यासाठी हवी असते
जिज्ञासा, डोळ्यातील तहान
अगदी ....
आता खिडकीतून वर्गात
डोकावणाऱ्या गोड मुलासारखी

ईच्छा अनेक गोष्टी जाणून घेण्याची
आणि न कंटाळणारी नजर

डोकवून पाहता यायलाच हवं
स्वतःच्या अंतर्मनात
तितक्याच निरागसपणे ..
त्या मुलाच्या गोड स्मित हास्यासारखं


- भार्गव हिरवे
(संगणक अभियांत्रिकी - अंतिम वर्ष)

Monday, August 10, 2015

कवीतांच संमेलन

एकदा कवीतांच संमेलन भरल
सगळ्या मुळातच दर्जेदार

आपापली पत सांभाळणाऱ्या
आपापल्या कुळाच नाव,
अभिमानानी उच्चारणाऱ्या

कुणी म्हणाली म्या  यमक
कुणी म्हणाली मुक्तछंद
कुणी खाला म्हणाल्या,
" हम गज़ल है ।"
तर लहान लहान मूली सांगत होत्या,
मी बड़बड़ी आणि मी चारोळी

कुणी म्हणाला, मी पोवाडा
तर कुणी म्हणाला , अभंग
त्याच्या उच्चारातून जाणवत होता,
मंदिराच्या गभार्यातला पवित्र घंटानाद

- भार्गव हिरवे
(संगणक अभियांत्रिकी - अंतिम वर्ष )